डॉ. रामचंद्र देखणे
ब्रह्मसाम्राज्यदीपिका । वर्णियेली गीतेची टीका ।।
या नाथमहाराजांच्या वर्णनाप्रमाणे त्यांनी 'ज्ञानेश्वरी' नावाची गीतेवरील टीका लिहून आपले गुरू निवृत्तीनाथांच्या पुढे ठेवली. निवृत्तीनाथांना मोठा आनंद होऊन त्यांनी ज्ञानदेवांना सांगितले, 'तू गीतेवर उत्तम टीका लिहून 'बोली अरूपाचे रूप दावीन,' ही प्रतिज्ञा पूर्ण केलीस. या ग्रंथाचा जगाला खूप मोठा उपयोग होईल. पण त्या अमृतरूप परमात्म्याचा तुला स्वत:ला काय अनुभव आला, ते तू मला सांग.' ही निवृत्तीनाथांची आज्ञा शिरसावंद्य मानून अमृतरूप परमात्म्याचा जो अनुभव ज्ञानदेवांनी सांगितला, त्याचेच नाव 'अमृतानुभव' होय. या ग्रंथाच्या निर्मितीचे प्रयोजन सांगताना ज्ञानदेवांनी अमृतानुभवाच्या दहाव्या प्रकरणात अनेक ओव्या लिहिल्या आहेत.
परि महेशे सूर्याहाती। दिधली तेजाची सुती।
तया भासा अंतर्वर्ती। जगची केले।।१०-२।।
ईश्वराने तेजाने आणि प्रकाशाचे सूत्र सूर्याच्या हाती दिले; पण त्याने ते केवळ स्वत:पुरते न ठेवता त्या तेजाने सर्व जगाला प्रकाशित केले. तसे माझ्या गुरूंनी माझे निमित्त करून हा ब्रह्मानुभाव जगाला दिला आहे. १) शिव-शक्ती समावेशन, २) श्रीगुरुस्तवन, ३) वाचाऋण परिहार, ४) ज्ञानाज्ञानभेदकथन, ५) सच्चिदानंदपदत्रयविवरण, ६) शब्दखंडन, ७) अज्ञानखंडन, ८) ज्ञानखंडन, ९) जीवनमुक्तदशाकथन, १०) ग्रंथपरिहार या दहा प्रकरणांत ग्रंथाचे विभाजन केले आहे.
अमृतानुभ ग्रंथाच्या आरंभी ज्ञानदेवांनी
यत् अक्षरम् अनाख्येयम् आनंदम् अजम् अव्ययम्।
या श्लोकाने सुरुवात करून संस्कृतचे पाच श्लोक नमनात्मक केले आहेत. ते पाच श्लोक म्हणजे संपूर्ण अमृतानुभवच आहे. या पाच श्लोकांत सद्गुरू, ब्रह्मविद्या, प्रकृतिपुरुष (शिव-शक्ती) आणि स्वरूपेकरून परिपूर्ण शंभू यांना वंदन केले आहे. पहिल्याच प्रकरणात देवो-देवी, अर्थात प्रकृतिपुरुष यांचे ऐक्य वर्णन केले असून, अद्वैत सिद्धान्ताच्या पायावर पुढील सर्व ग्रंथाची निर्मिती झाली आहे. अमृतानुभवात ज्ञानदेव अज्ञान न मानता जगाची उत्पत्ती मांडतात. हे एक वेगळेपण आहे. शाब्दिक तत्त्वज्ञानाला त्यात प्राधान्य नाही, तर स्वानुभवाला आहे. अनुभव आणि तत्त्वचिंतन या दोन्ही भूमिकांतून ज्ञानदेवांच्या सिद्धान्तानुभवाचा गाभाच अमृतानुभवातून प्रगट झाला आहे.
https://maharashtratimes.com/editorial/article/analysis-of-saint-dnyaneshwars-volume-amrutanubhav/articleshow/70018276.cms
अमृतानुभव
अमृतानुभव अथवा अनुभवामृत[१] (मराठी: अमृतानुभव) ही संत ज्ञानेश्वर यांची १३व्या शतकातली रचना आहे. ती मराठी साहित्यात एक मैलाचा दगड आहे. अमृतानुभव हा ज्ञानेश्वरांचा स्व-रचित स्वतंत्र ग्रंथ असून त्याला चिद्विलासानंद असेही नाव आहे.
Full text is available on this link.
https://www.transliteral.org/pages/i150420195550/view
also available here
https://panotbook.com/amrutanubhav/