सोमवार, २१ मे, २०१८

Seeds बियाणे


प्रमोद लक्ष्मण तांबे यांच्या fb wall वरून ....

Forwarded.
पुर्णपणे शाश्वत शेती करायची या उद्देशाने आम्ही आमचं गावं गाठलं आणि काही अडचणी समोर आल्या .त्यातील मुख्य अडचण म्हणजे देशी बियाणे मिळणे.गावात आजूबाजूला चौकशी करून सुध्दा खूप पिकांची देशी बियाणे मिळेनात पण शोध चालूच ठेवला तेंव्हा एक नाव समोर आलं संजय पाटील.गेली 12 वर्षे हा माणूस देशी बियाणे जतन आणि संवर्धन यावर काम करत आहे.त्यांच्याशी बोलताना काही गोष्टी समोर आल्या ज्या शेअर कराव्या वाटल्या तेच लिहीत आहे

सध्या जगभरातील सगळ्या बियाणांची जी बियाणे बँक आहे ती नॉर्वे या देशात आहे . तेथील काही कंपन्याच्या ताब्यात जगातील सर्व बियाणे आहेत .हरितक्रांतीच्या नावाखाली, अधिक उत्पादन देतील अशी आम्ही बियाणे बनवतो असे सांगून जगभरची सगळी बियाणे जमवून त्यावर प्रक्रिया करण्यात आली ;आणि मग नवी बियाणे त्या कंपन्यांच्या नावाने पेटंट मिळवून बाजारात उतरवली. शेतकऱ्यांना ही लालूच दाखवली की आपल्याला एका वेळी जास्त उत्पादन ,कमी वेळ ,कमी श्रम हे सगळे ह्या संकरित बियाणाने साधता येते. साहजिकच जगभरची लोकं ह्याला भुलली आणि आपले स्वतः चे बियाणे टाकून हे तथाकथित उत्तम बियाणे घेतले.आता अशी परिस्थिती आली आहे की आपली पूर्वीची बियाणे तर नष्ट झाली आहेत आणि जी संकरित बियाणे आहेत ती तर परत वापरताच येत नाही .मग या कंपन्या देतील तरच आणि त्याच भावात आपण अन्न पिकवू शकू .ते सांगतील त्या अटींवर जगाला ते नाचवत आहेत.कोणत्या देशाने काय पीक घ्यायचे हेही तेच ठरवतात .

पण सुदैवाने आपल्या देशात मात्र अजून काही प्रमाणात देशी बियाणं जिवंत आहे . त्याची जी कारण आहेत ती म्हणजे आपली जैव विविधता ,आदिवासी लोकं (ज्यांना आमच्या तथाकथित विकासाचा गंध नाही ),काही जुन्या रूढीं परंपरा , आणि महिलांच्या परसबागा .
तसेच आपल्या पैकी खूप कमी लोकांना माहीत आहे की ज्या देशांना आपण विकसित म्हणून नावजतो त्यापैकी खूप देशांत शेतकऱ्यांनी त्याच्या शेतात काय पिकं घ्यायचं हे सरकार ठरवतं. ते ही या बियाणं कंपनी सांगतील तेच पिकं घ्यायचं. पण सुदैवाने भारतात अजून अशी पद्धत नाही म्हणून छोटे छोटे शेतकरी आपलं बियाणं जगवू शकतात.

आपल्या कडील सण साजरे करण्यामागे काही उद्दिष्टे होती .उदा.आपल्या कडे नवान्न पौर्णिमा म्हणून साजरी करतात .त्या दिवशी माझ्या कडे जे पिकं आलं त्याचे तोरण दाराला लावायचे. म्हणजे जे धान्य माझ्या तोरणात नाही ते पिकं मी घेतले नाही हे कळायचं. इतर लोकं ते धान्य मला देणार मीहि तसेच करायचे.
दुसरा सण संक्रांत यात प्रत्येक स्त्री 5 जणींना वाण द्यायची त्यात आपल्याकडील बियाणे असायचे .म्हणजे एका घरी वेगळी 25 बियाणे मिळायची . आता शहरांशी संपर्क आल्यामुळे गावातील बायकाही प्लास्टिक डबे वाण म्हणून देतात . कारण शहरात शिकलेली माणस राहतात ते थोडीच चुकणार आहेत .

आपल्याकडे बियाणे विकणे हे पाप होते.आता पाप पुण्य हा ढोंगीपणा झाला त्यामुळे हे सण नष्ट झाले . नाहीतर नुसता उपचार राहिला सण साजरा करायचा.
नंदुरबार जिल्ह्यात अस्थम्भा नावाचा डोंगर आहे तिथे अजूनही दिवाळीनंतर 150000 लोकं अश्वत्थामा च्या दर्शनासाठी येतात. नैवेद्य म्हणून आपले बियाणे आणतात आणि प्रसाद म्हणून तिथे ठेवलेलं बियाणं घरी नेतात.कोणीही हा उत्सव आयोजित करत नाहीत तरी रुढी नुसार स्वतःहून लोकं जमतात आणि बियाणांची देवाण घेवाण होते.

आपल्या कडे धान्य साठवणे ,बियाणे टिकवणे ह्याच्याही खूप विचारपूर्वक तयार केलेल्या पध्दती होत्या .पण त्या आता गावातूनच हद्दपार झाल्या.
गावातील जुन्या लोकांना घोळात घेऊन विचारले की तुम्हाला या पद्धती कश्या माहीत नाहीत तर म्हणतात आमची मुले शाळेतून शिकून सवरून आली आहेत. ते म्हणतात तुम्ही अशिक्षित आहात तुम्हांला काही कळत नाही.तुम्ही नका शिकवू आम्हाला. हा अनुभव आमचाच नाही तर सेंद्रिय शेतीत काम करणाऱ्या खूप जणांना आलेला आहे .खरंतर या लोकांना खूप ज्ञान आहे पण आपण अडाणी या न्यूनगंडा मुळे काही बोलत नाहीत.1922 ते 1938 भारतात सर अल्बर्ट हॉवर्ड नावाचे इंग्लंड चे शेती संशोधक येऊन गेले त्यांनी ब्रिटिश राणीला सांगितले होते की भारतातील प्रत्येक शेतकरी हा संशोधक आहे त्याला नष्ट करू नका जगाला ते घातक ठरेल.पण इथले शास्त्रज्ञ मात्र आमच्या शेतकऱ्यांना वेडं ठरवतात.नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील एक अत्यंत खेडूत बाई ' राई बाई पोपेरे 'ह्यांचे बियाणांवर खूप काम आहे. पण जेव्हा पहिल्यांदा त्या स्टेजवर बोलणार होत्या त्यावेळी समोर माशेलकर, भटकर,अकोलकर असे शास्त्रज बसणार आहेत मग काम जरी या बाईचं असेल तरी कोणीतरी शिकलेल्या माणसाने प्रेझेन्टेशन द्यावे अशी संयोजकांनी मागणी केली . पण संजय पाटीलांनी ते न ऐकता त्या बाई बोलणार हाच आग्रह धरला .ज्यावेळी त्या बाईने आपले ज्ञान दाखवले .तेंव्हा ही मंडळी आवाक झाली.ही शास्त्रज्ञ मंडळी तेंव्हा पासून त्यांच्या कडे जायला लागली .पण आमचा दृष्टकोन कधी बदलणार?
आम्ही आमच्या पूर्वजांना नावं ठेवतो की माणसाची ओळख ते जातीवरून करायचे किती संकुचित होतें ते. पण दुर्देवाने सध्या आपण माणसाची ओळख त्याच्या साक्षरते वरून करतो.त्याने ह्या युनिव्हर्सिटी हे संशोधन केले म्हणजे त्याला या बाईपेक्षा कितीतरी ज्ञान असणार असे आपण गृहीत धरतो.भारतात अश्या कितीतरी राईबाई आहेत ज्याच्याकडूनच आपलं जुनं शेती तंत्र आपल्याला कळू शकतं.या शास्त्रज्ञांनी प्रयोग शाळेत संशोधन केलेले असते ते कित्येक वेळी जमिनी वर लागूच होत नाही असे अनुभव आलेले आहेत.

असे म्हणतात की भारतात तांदळाच्याच 15000 जाती होत्या. त्या नष्ट होऊन फक्त 500 वर आल्या आहेत पण ह्या जरी जाती आपण टिकवल्या तरी आपण जगात टिकू शकू.कारण भात हेच भारतचे मुख्य पिकं आहे .आता आपल्याला अश्या कितीतरी sites दिसतील की गहू किती त्रासदायक आहे आपल्याला हे सांगतात . हरितक्रांती च्या नावाने देशात मुबलक पिकं निर्माण होणार या गोंडस नावाखाली गहू आपल्यावर लादला .
मध्यंतरी रेशनवर 2 रु किलो गहू मिळायला लागला .त्यामुळे काही श्रम न करता जर धान्य मिळत तर शेती कराच कशाला ?असा विचार करून कोकणातील शेतकऱ्यांनी नाचणी घेणे सोडलं आणि घाटावर ज्वारी कमी पिकू लागली.कित्येक ठिकाणची ज्वारी आणि नाचणीची देशी बियाणे नष्ट झाली.त्यानंतर लगेच असं संशोधन झाले आहे की नाचणी ,ज्वारी हे माणसाला हितकारक आहेत .म्हणून कित्येक डॉक्टर गहू बंद करून नाचणी आणि ज्वारी लोकांना खायला सांगतात .म्हणजे परत ही पिकं घ्यायची तर बियाणे कुठलं ?याचं कंपन्याचं. नाहीतर यांचाच multi grain आटा घ्यायचा म्हणजे तुम्ही पिकवू नका आम्ही देते तुम्हाला वाटेल त्या भावाला.
पूर्वी आपल्या कडे धान्याची खूप variety होती.कोणत्या सणाला कोणते पदार्थ करायचे हे सगळे ऋतू,स्थळ ह्यानुसार ठरवले होते .ते सगळे आरोग्या साठी उत्तम होते .आता जागतिकरणं या नावाखाली फक्त गहू,तांदूळ आणि मका ह्या तीनच धान्यांनी आपलं 85 % खाणे व्यापून टाकलं आहे.त्यामुळे हळूहळू खूप प्रकारची स्थानिक धान्य लुप्त झाली आहेत.जी की निसर्गाने आपल्या साठी बनवली होती. ते नसल्याने आता नवनवीन आजार निर्माण झाले.

या वर उपाय म्हणजे आपल्या जुन्या पद्धतीने परत शेती सुरू करणे.आपली शेती ही शाश्वत ,परस्पर पूरक होती. फक्त एक देशी गाय आणि देशी बियाणे ह्या वर उत्तम शेती होऊ शकते.गरज आहे ती फक्त ते जाणून घ्यायची.
सध्या भारतात या बियाणे जतनावर खूप लोकं अगदी जीवावर उदार होऊन काम करत आहेत.त्यांना multi नॅशनल co धमक्या देतात पण तरीहि ते आपलेे काम सोडत नाहीत. ही लोकं शेतकऱ्यांना जमा करतात त्यातील जुन्या लोकांकडून तेथील स्थानिक बियाणांची माहीती घेतात .बाकीच्यांना पटवतात की देशी बियाणे च वापरा .जुन्या लोकांचे ऐका . तुम्हीच स्वतः त्याचे जतन आणि संवर्धन करा .बियाणे ही कधीही विकायची गोष्ट नाही तसेच खरेदीही करायची गोष्ट नाही हे पटवतात . आपल्या कडील रूढी परंपरा ह्या शहरातील लोकांचे बघून सोडू नका, पारंपरिक पद्धतीने शेती केल्यास ती शाश्वत ठरते.भरघोस उत्पादन याकडे न बघता चांगले पिकं या कडे लक्ष केंद्रित करा.
जागतिक करार नुसार आपल्या कित्येक बियांचे पेटंट हे या multi नॅशनल co. कडे आहेत .त्यासाठी लढा देणे ,शेतकऱ्यांना स्वतः कडील बियाणं समृद्ध करून त्यांची पेटंट घेऊन देणे अशी अनेक जोखमीची कामे ही लोकं करत आहेत. अश्या लोकांना मदत सोडाच पण त्यांची साधी माहितीही आपल्याला नसते.
या सगळ्यांना दिर्घ आयुष्य मिळो ही प्रार्थना आणि त्यांच्या कार्याला माझ्या हार्दिक शुभेच्छा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा