बुधवार, १३ जून, २०१८

अष्टांग योग

अष्टांग योग
पतंजलिंनी योग चा अर्थ चित्तातील वृत्तिंवर निरोध (योगः चित्त-वृत्ति निरोध:) सांगितला आहे· त्यांच्या विचारांनुसार योगाचे आठ अंग आहेत, जे खालिल प्रमाणे आहेत:
  • यम (अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह) बाहेरचे अंग
  • नियम (स्वाध्याय, सन्तोष, तप, पवित्रता, आणि ईश्वर च्या प्रति चिन्तन) बाहेरचे अंग
  • योगासन बाहेरचे अंग
  • प्राणायाम बाहेरचे अंग
  • प्रत्याहार बाहेरचे अंग
  • धारणा आतले/मानसीक अंग
  • ध्यान आतले/मानसीक अंग
  • समाधी आतले/मानसीक अंग

अष्टांग योग आणि त्याचे योगाभ्यासातील महत्त्व


अष्टांग योग आणि त्याचे योगाभ्यासातील महत्त्व


योगशास्त्र हे मुख्यत: प्रायोगिक शास्त्र applied science किंवा experimental science असल्यामुळे त्यात सैद्धांतिक भागाबरोबर किंवा त्यापेक्षा अधिक महत्त्व प्रयोगाला किंवा साधनेला आहे. म्हणूनच महामुनी पतंजलींनी योगदर्शनामध्ये चित्तवृत्तींच्या निरोधाचे उपाय, क्रियायोग, साधनेच्या मार्गात येणारे अडथळे आणि ते दूर करण्यासाठी ध्यानादी प्रकार सांगितले आहेत. ते म्हणजेच योगाची आठ अंगे किंवा अष्टांग योग होय.
ही आठ अंगे मुख्यत्वे दोन विभागांत आहेत. बहिरंग योग - ज्यात यम, नियम, आसन, प्राणायाम येतात आणि अंतरंग योग - ज्यात धारणा, ध्यान, समाधी येतात. पाचवे अंग म्हणजे प्रत्याहार जे बहिरंग योगाला अंतरंग योगाला जोडणारा सेतू आहे. माणसाचे स्थूल शरीर व सूक्ष्म मन यांचा अत्यंत घनिष्ट संबंध आहे. म्हणूनच त्यांचा एकत्रितपणे विचार करून शरीरसंवर्धनासाठी आणि मनशुद्धीसाठी, मनोकायिक आरोग्य लाभावे म्हणून ही यम, नियम आदी साधने सांगितली आहेत. ही अंगे मानवी अस्तित्वाच्या बाह्यांगाचा प्रामुख्याने विचार करतात, म्हणून त्यांना बहिरंग योग म्हणतात.
लयबद्ध श्वसनाला योगामध्ये अतिशय महत्त्व आहे. प्राणायाम हे योगोपचारातले एक प्रमुख साधन आहे. प्राणायामाच्या अचूक व नियमित सरावामुळे फुफ्फुसांची श्वसनक्षमता वाढते आणि म्हणूनच साधकाचे आयुष्य वाढते. साधकाला निरोगी शरीर, स्थिर व प्रसन्न चित्त, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अचूक निर्णयक्षमता प्राप्त होते.
प्रत्याहार म्हणजे मन आणि इंद्रिये यांच्यावर ताबा मिळवण्याची शिस्त. प्रत्याहाराच्या अभ्यासामुळे इंद्रियांना शांत ठेवणे शक्य होते. तर एखाद्या बिंदूवर, विषयावर एकाग्रता साधण्याची कला म्हणजे धारणा. यामुळे आंतरिक जागरूकता निर्माण होते व मनात सतत उद्भवणाºया विचारांचे संकलन होऊन मानसिक ताणतणाव दूर होतात. धारणा दीर्घकाळ टिकून राहिली की मगच ध्यान लागते. साधकाच्या संपूर्ण मनोकायिक रचनेमध्ये सुयोग्य बदल घडवून आणण्याची शक्ती असते म्हणूनच ध्यानाला अतिशय महत्त्व आहे.
कोणत्याही त-हेचा व्यत्यय न येता दीर्घकाळ ध्यान लागले की समाधी लागते. हे योगसाधनेतील शेवटचे अंग किंवा टप्पा आहे. समाधी अवस्था हीसुद्धा एक अनुभूती आहे आणि त्यामुळेच ती वर्णनातीत आहे.
मनापेक्षाही सूक्ष्म स्वरूपातील आत्मा हा शरीर व मन यांच्या दुहेरी कवचामध्ये सुरक्षितपणे, अव्यक्त स्वरूपात वास करतो असे मानले जाते. जणू मंदिरातील गाभाºयात खोलवर असणारे धीरगंभीर शिवलिंगच. अशा अव्यक्त अतिसूक्ष्म, खोलवर दडी मारून बसलेल्या आत्म्याच्या उन्नतीसाठीच धारणा, ध्यान आणि समाधी ही तीन साधने आहेत.
आरोग्यप्राप्तीसाठी योगाभ्यास करणा-या तुम्हा-आम्हासारख्यांना फक्त योगासने, प्राणायाम व ध्यान म्हणजे योगाभ्यास असे वाटते. याच गैरसमजुतीमुळे अनेकदा ते चुकीच्या टप्प्यांवर चुकीच्या पद्धतीने अवलंबिली जातात आणि विनाकारण आपत्तींना आमंत्रण मिळते.
प्रत्येक साधकाने जीवनाची योग्य दिशा दाखवणा-या सर्वांगाचा टप्प्याटप्प्याने अभ्यास केला तर योगाभ्यासातून अपेक्षित व्याधीरहित जीवन आपल्याला जगता येईल.
मधुमती निमकर - योगतज्ज्ञ