बुधवार, १३ ऑक्टोबर, २०२१

Saha soneri pane part 6

*सहा सोनेरी पाने.* 
*स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.* 
भाग-६
परकीय, आक्रमक,आणि अंशत: परधर्मिय ग्रीकांना, भारतीय लोक *यवन* म्हणत. पण मुसलमानांना यवन म्हणणे चूकीचेच ठरेल. आक्रमक व परकीय असले तरी त्यावेळी ग्रीक सापेक्षत: विद्याव्यासंगी व सभ्य जगतात मोडत होते. मुसलमानांच्या टोळधाडी धर्मांध, रानटी नि विध्वंसक अशा राक्षसी वृत्तीच्या होत्या. त्यामुळे मुसलमानांना यवन म्हणणे, यवन शब्दाची पायमल्लीच होईल.

तस म्हटल तर विनोदाचा भाग म्हणायला हवा अशा एका गोष्टीचा स्वातंत्र्यवीरांनी उल्लेख केला आहे.

पारसिक लोक अलेक्झांडरला सिकंदर म्हणून ओळखत. पारसिक लोक आपल्या मुलांचे नाव सिकंदर ठेवत. नंतर मुसलमानांनी पर्शिया काबीज केला. तेव्हांपासून मुसलमानांना अस वाटायच की अलेक्झांडर(सिकंदर) आपल्यातलाच होता. त्यामुळे तेही आपल्या मुलांचे नाव सिकंदर अस ठेवायला लागले. *जो जीता वही सिकंदर* सारख्या उक्ति त्यामुळेच तयार झाल्या. 
खर म्हणजे *जो जीता वही सिकंदर नाही तर चंद्रगुप्त* वगैरेसारख्या उक्ति आता आपण वापरायला हरकत काय ? (हे मी म्हणतोय हं😊)
(क्रमश:)
               रविकांत करंदीकर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा