बुधवार, १३ ऑक्टोबर, २०२१

part 5

*सहा सोनेरी पाने*
*स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर*
भाग-५
*भारताची तत्कालीन व्याप्ती*

दोन अडीच हजार वर्षापूर्वी सिंधू नदीच्या पलिकडे अगदी इराणच्या सीमेपर्यंत भारतीयांची वस्ती आणि राज्ये पसरलेली होती.
हिंदूकुश पर्वताला ग्रीक परोपनिसस(Paropnisus) म्हणत. आजचे अफगाणिस्थान तेव्हां *गांधार* होते. काबूल नदीचे आपले प्राचीन नाव *कुभा* होते. हिंदुकुश पर्वतापासून सिंधू नदी समुद्राला जेथे मिळते तेथपावेतो, तिच्या दोन्ही काठांना वैदिक धर्मानुयायी भारतीयांची लहान मोठी स्वतंत्र राज्यांची मालिका पसरलेली होती. ही बहुतेक राज्ये लोकसत्ताक पध्दतीची प्राजके(Republics) होती. त्यांना गणराज्ये म्हणत. राजसत्ताक पध्दतीची दोन/तीनच राज्ये होती त्यातील पौरव राजाचे राज्य सगळ्यात मोठे होते.
ग्रीक पुराणाचा आधार घेतला तर, त्यात अस म्हटल गेलय की, सिंधुपलीकडील गांधार प्रांतातून भारतातील आर्यवंशी जानपदाची एक तुटक शाखा ग्रीसकडे गेली. अलेक्झांडरचे सैन्य जेव्हां या भागात आले तेव्हां, स्वत:ला ग्रीक समजणारा एक लहानसा समुह त्यांना आढळला. अलेक्झांडरलाही आपल्या प्राचीन पूर्वजांचे हेच मूळ ठिकाण असे वाटले. ग्रीक सैन्याला आपल्या पितृभूमीचे दर्शन झाल्याचा इतका अत्यानंद झाला की युध्द बंद करून त्यांनी महोत्सव साजरा केला. ग्रीकांच्या देवतांचे, वैदिकांच्या देवतांशी अत्यंत सादृश्य होते. खूप साम्य होते. देवतांच्या नावाचे उच्चार अपभ्रंशामुळे वेगळी वाटत इतकेच. ग्रीकही यज्ञे, हवने करीत. ग्रीकांना आयोनियन्स म्हणत. *आयोनियन्सवरून यवन* शब्द पडला.
 ययातीचा पुत्र अनु ह्याचेच ग्रीक लोक वंशज असतील का ? 😊 अन्वायन-आयोनियन अशी अपभ्रष्ट रूपे होत गेली असतील का ? हा संशोधनाचा विषय आहे, संशोधकांनाच सोडवू दे. 

परंतु *ग्रीक म्हणजेच यवन. मुसलमान किंवा सर्वच परराष्ट्रीय आक्रमकांना यवन म्हणणे चूकीचेच.*
आणखी एक खुलासा इथे करावासा वाटतो.
गांधारपासून पंचनद(पंजाब) पर्यंत, तेथून सिंधू नदी समुद्रास मिळते तेथपर्यंत, ज्या ज्या भागात अलेक्झांडरचा संचार झाल्याची वर्णने ग्रीक लेखकांनी केली आहेत त्यात वैदिक धर्मानुयायांचे उल्लेख आहेत, परंतु बुध्द किंवा बुध्दपंथाचा चुकूनसुध्दा उल्लेख नाही. यावरून बुध्दाच्या मृत्यूनंतर २५०/३०० वर्षापर्यंत मगध प्रांतातच बुध्दपंथाचा प्रसार झाला होता, त्यापलिकडे त्याचे पाऊलही पडलेले नव्हते हे स्पष्ट होते. पुढील इतिहास बघताना ही बाब लक्षात ठेवावी लागेल.
(क्रमश:)
              रविकांत करंदीकर.

Saha soneri pane part 6

*सहा सोनेरी पाने.* 
*स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.* 
भाग-६
परकीय, आक्रमक,आणि अंशत: परधर्मिय ग्रीकांना, भारतीय लोक *यवन* म्हणत. पण मुसलमानांना यवन म्हणणे चूकीचेच ठरेल. आक्रमक व परकीय असले तरी त्यावेळी ग्रीक सापेक्षत: विद्याव्यासंगी व सभ्य जगतात मोडत होते. मुसलमानांच्या टोळधाडी धर्मांध, रानटी नि विध्वंसक अशा राक्षसी वृत्तीच्या होत्या. त्यामुळे मुसलमानांना यवन म्हणणे, यवन शब्दाची पायमल्लीच होईल.

तस म्हटल तर विनोदाचा भाग म्हणायला हवा अशा एका गोष्टीचा स्वातंत्र्यवीरांनी उल्लेख केला आहे.

पारसिक लोक अलेक्झांडरला सिकंदर म्हणून ओळखत. पारसिक लोक आपल्या मुलांचे नाव सिकंदर ठेवत. नंतर मुसलमानांनी पर्शिया काबीज केला. तेव्हांपासून मुसलमानांना अस वाटायच की अलेक्झांडर(सिकंदर) आपल्यातलाच होता. त्यामुळे तेही आपल्या मुलांचे नाव सिकंदर अस ठेवायला लागले. *जो जीता वही सिकंदर* सारख्या उक्ति त्यामुळेच तयार झाल्या. 
खर म्हणजे *जो जीता वही सिकंदर नाही तर चंद्रगुप्त* वगैरेसारख्या उक्ति आता आपण वापरायला हरकत काय ? (हे मी म्हणतोय हं😊)
(क्रमश:)
               रविकांत करंदीकर.

saha soneri pane part 7

*सहा सोनेरी पाने* 
*स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.*
भाग-७

तक्षशिलेचा राजा *अंबुज(अंभी)* याने अलेक्झांडरचे मांडलिकत्व, *पौरस राजाचा* बिमोड करण्यासाठी स्वीकारले. नंतर *पौरस राजाचा* पराभव, पौरसाने अलेक्झांडरला दिलेले बाणेदार उत्तर, अलेक्झांडरने दाखवलेला दयाळूपणा, वगैरे इतिहास मोठ्या हुशारीने आपल्याला शाळेतील इतिहासात तेव्हांच्या शिक्षण तज्ञांनी शिकवला आहेच. अलेक्झांडरचे भाट असलेल्या तत्कालीन ग्रीक इतिहासकारांनी तो प्रसंग तसा लिहीला आणि पाश्चात्यांचे भाट असलेल्या आमच्या शिक्षण तज्ञांनी(?😡) तो भाग तसाच्या तसा उचलून आम्हाला शिकवला.
पौरसाला त्याचे राज्य परत देण्या मागची खरी मेख वेगळीच होती. अलेक्झांडरसाठी ती राजकीय अपरिहार्यता होती.
स्वप्नात राज्य दिले म्हणून जागेपणीही राज्य देऊन टाकायला अलेक्झांडर कोणी भाबडा,सत्यवचनी वगैरे राजा नव्हता.
अलेक्झांडरचे लक्ष्य त्या काळातील, भारतातील सर्वात मोठे व शक्तिशाली राज्य मगध आणि त्याची राजधानी पाटलीपुत्र हे होते. जर पौरसाला ठार मारले, किंवा पदच्युत करून आपला कोणी क्षत्रप(त्याला ग्रीक राज्यपाल किंवा गव्हर्नर म्हणता येईल)त्या राज्यावर बसवला तर, त्या राज्यातील स्वाभिमानी भारतीय जनता ग्रीकांच्या द्वेषाने खवळण्याची शक्यता जास्त होती. त्याचा शिकंदराला त्रासच झाला असता. त्यामुळे कौतुक, दयाळूपणा वगैरे ग्रीकांनी लिहीलेल्या भाकड कथा आहेत हे लक्षात घेणे जरूरीचे आहे.
हे सगळ चालू असताना, त्यावेळी आणखी थोड वेगळ काय घडत होत ते पाहूया.
अलेक्झांडर भारतावर स्वारी करण्याच्या फार पूर्वीपासून संपूर्ण जगात भारतातील काही विद्यापीठे खूप प्रसिध्द होती. त्यापैकी एक म्हणजे तक्षशिला विद्यापीठ. देशोदेशीचे विद्यार्थी एवढेच नव्हे,तर परदेशी राजपुत्रही या विद्यापीठात राज्यशास्त्र, युध्दशास्त्र यांचे शिक्षण घेत असत. 
योगायोगाने अलेक्झांडरने भारतावर चाल करून तक्षशिला ताब्यात घेतली तेव्हां, एक तेजस्वी, तरतरीत तरूण या विद्यापीठात शिक्षण घेत होता किंवा नुकताच शिक्षण घेऊन बाहेर पडला होता. त्याला राज्यशास्त्राचे, राष्ट्रीय क्रांतीकार्याचे शिक्षण देत होते एक प्रौढ पंडित. 
शिकंदराच्या स्वारीच्या हलकल्लोळात ही सामान्य दिसणारी, दोन असामान्य माणसे कोणाच्याही नजरेत भरलेली नव्हती.
शिकंदर जेव्हां भारतातील रावरावळांचे, राजा महाराजांचे मुकुट एकत्र करून, वितळवून स्वत:साठी, भारतीय सम्राटपदाचा महामुकुट तयार करण्याचे स्वप्न बघत होता तेव्हां, आयताच तयार होणारा तो मुकुट त्याच्याकडून हिसकावून घेऊन, आपल्या तरूण शिष्याच्या डोक्यावर कसा ठेवता येईल याच्या योजना जे प्रौढ आचार्य मनोमन करीत होते, ते होते, *आचार्य चाणक्य.*
(क्रमश:)
                  रविकांत करंदीकर.

Navaratri

🔶 *👍नऊ संख्या 👍आणि नवरात्र👍अध्यात्मिक संबंध👇आणि🌹 महत्त्व 🌹👇*

■ *नवरात्रीच्या घटाभोवती पसरलेल्या मातीत पेरली जाणारी ‘नऊ’ धान्यं : साळ, गहू,ज्वारी,बाजरी,मका,मूग,हरभरा,जवस,मटकी.*

■ *दुर्गामातेचे ‘नऊ’ अवतार : शैलपुत्री,ब्रह्यचारिणी,चंद्रघंटा,कुष्मांडा,स्कंदमाता,कात्यायिनी,कालरात्री,महागौरी,सिद्धिरात्री.*

■ *दुर्गादेवीची ‘नऊ’ नावं :अंबा,चामुंडा,अष्टमुखी,भुवनेश्वरी,ललिता,महाकाली,जगदंबा,नारायणी,रेणुका.*

■ *महाराष्ट्रातील देवीमातेची प्रसिद्ध ‘नऊ’ देवस्थानं : वज्रेश्वरी (वसई),महालक्ष्मी (डहाणू),महाकाली (अडिवरे), सप्तशृंगी (वणी),रेणुकादेवी (माहूर),महालक्ष्मी (कोल्हापूर),तुळजाभवानी (तुळजापूर),योगिनीमाता (अंबेजोगाई),श्री एकवीरादेवी (कार्ला).*

■ *नवरात्रींचे ‘नऊ’ रंग : लाल,निळा,पिवळा,हिरवा,राखाडी,भगवा किंवा केशरी,पांढरा,गुलाबी, जांभळा.*

■ *नवग्रहांच्या ‘नऊ’ समिधा : रुई,पलाश,खदिर,अपामार्ग,पिंपळ,औदुंबर,शमी,दुर्वा,कुश.*

■ *नवग्रहांची ‘नऊ’ रत्नं : माणिक,मोती,प्रवाळ,पाचू,पुष्कराज,हिरा,नीलमणी,गोमेद,वैडूर्य,पीतवर्ण-मणी.*

■ *‘नऊ’ प्रकारची दानं : अन्नदान,धनदान,भूदान,ज्ञानदान,अवयवदान,श्रमदान,रक्तदान,वस्त्रदान,देहदान.*

■ *नवविध भक्तीचे ‘नऊ’ प्रकार :श्रवण,कीर्तन,स्मरण,अर्चन,पादसेवन,वंदन,सख्य,दास्य,आत्मनिवेदन.*

■ *प्रसिद्ध ‘नऊ’ नाग : शेष,वासुकी,तक्षक,शंखपाल,कालिया,कर्कोटक,पद्मक,अनंत,पद्मनाभ.*

■ *समस्त मानवजातीला सामावून घेणा-या पृथ्वीचे नवखंड : भरतखंड (पूर्व),केतुमालखंड (पश्चिम),रम्यखंड (दक्षिण), विधिमालखंड (उत्तर),वृत्तखंड (आग्नेय),द्रव्यमालखंड (नैऋत्य),हरिखंड (वायव्य), हर्णखंड (ईशान्य),सुवर्णखंड (मध्य).*

■ *मानवी देहांतर्गत असलेले ‘नऊ’ कोश : अन्नमय,शब्दमय,प्राणमय,आनंदमय,मनोमय,प्रकाशमय,ज्ञानमय,आकाशमय,विज्ञानमय.*

■ *मानवी मनाचे ‘नऊ’ गुणधर्म : धैर्य,सामर्थ्य,भ्रांती,कल्पना,वैराग्यवादी,सद्विचार,रागद्वेषादी असद्विचार,क्षमा,स्मरण,चांचल्य.*

■ *मानवी शरीराच्या ‘नऊ’ अवस्था : मातेच्या उदरातली निषेक रूपावस्था,गर्भावस्था,जन्म, बाल्य,कौमार्य,तारुण्य,प्रौढत्व, वृद्धत्व.*
*-----------------------*

सोमवार, १३ सप्टेंबर, २०२१

kavita on Marathi Brahman

*कोकणस्थांची कविता... तिला देशस्थांचे उत्तर* 

*कोकणस्थांची कविता 😗

मी आहे ब्राह्मण कोकणस्थ
आम्ही कधीच बसत नाही स्वस्थ 

रीतीरीवाजांमध्ये आमचा अव्वल नंबर आहे
आमचीच पालखी प्रत्येक जण वाहे
बचतीचा मार्गच आमचा धर्म आहे.
आम्ही कधीच नसतो अस्ताव्यस्त
मी आहे ब्राह्मण कोकणस्थ!!१!!

वंशपरंपरा आम्ही दांडीवर कपडे टाकतो
पण त्याचा क्रम कधीच बदलत नसतो
बदलला तर आम्ही लगेच पिसाळतो
दुस-या जातीची सून आली तर होतो आम्ही त्रस्त
मी आहे ब्राह्मण कोकणस्थ!!2!!

एका काडीनेच गॅस पेटवितो
लगेच दुस-या गॅससाठी ती विझवून ठेवितो
वरण-भाताशिवाय आम्ही जेवत नसतो
त्यानेच जेवण होते आमचे मस्त
मी आहे ब्राह्मण कोकणस्थ!!3!!

लोकमान्य आमच्यातच जन्माला आले
सर्व क्रांतिकारक आम्हीच देशा दिले
स्त्रियांना अण्णासाहेबांनीच उद्धरले
साधू न होता राहतो नेहमी व्यस्त
मी आहे ब्राह्मण कोकणस्थ!!4!!

दादा फाळक्यांनी चित्रपटसृष्टीचा पाया घातला
राजा परांजपे यांनी देशभर पसरविला
माधुरीने त्यावर कळस चढविला
असे क्षेत्र नाही जेथे नाही आमचा हस्त
मी आहे ब्राह्मण कोकणस्थ!!5!! 

भांडणातसुद्धा आम्ही कमी नाही
तत्वांसाठी आमचे आयुष्य जाई
वाटण्यांमध्ये झाडूची सुद्धा विभागणी होई
त्यासाठी आम्ही होत नाही त्रस्त
मी आहे ब्राह्मण कोकणस्थ!!६!!

लाचारी करून मागत नाही दान
व्यवहार करतानाही राखतो अभिमान
नेहमी असते आमची ताठ मान
खर्चाला असते आमची कडक शिस्त
मी आहे ब्राह्मण कोकणस्थ!!७!!

गॅस सिलेंडर वर तारीख लिहितो
वेळेआधी संपला तर उपासच घडतो
तोच मग आमचा एकादशीचा दिवस होतो
उपासाला कधीच आम्ही खात नाही जास्त
मी आहे ब्राह्मण कोकणस्थ!!८!!

महिन्याची पेपर रद्दी मोजून लावलेली असते
वाण्याला तागडीची गरजच नसते
त्याच पैशातून आमची भिशी चालत असते
पै पैसा करून आम्ही घेतो खस्त
मी आहे ब्राह्मण कोकणस्थ!!९!!

चोवीस कॅरेट शिवाय सोने घेत नाही
पेठे-गाडगीळांशिवाय दुसरे दुकान पाहत नाही
दागिन्यांत आमची असते सर्वांवर मात
नाही वापरत आम्ही तांबे-पितळ-जस्त
मी आहे ब्राह्मण कोकणस्थ!!१०!

 *काय बरोबर ना ?* 

*देशस्थांचे उत्तर 😗 

आम्ही देशस्थ💐😀

जग जरी म्हणत असले कितीही बेशिस्त
तरी देखील अभिमानी ..आम्ही देशस्थ
 
नसतो जेवणाला आमच्या वेळ अथवा नियम
अतिथीच्या तृप्तीसाठी राखुन असतो संयम
व्यवहारापेक्षा माणुसकीला असतो व्रतस्थ
मी आहे ब्राह्मण देशस्थ !!

असतील कपडे जरी घरात कुठेही पडलेले
कपड्यांपेक्षा नातेसंबंधच अधिक सांभाळलेले
गदारोळात नात्यांच्या जरी होतो आम्ही त्रस्त
मी आहे ब्राह्मण देशस्थ !!

चहा झाला असेल ना? असे विचारत नाही
चहासाठी आलेला जेवण करूनच जाई
अघळ पघळ गप्पांमधे नेहमी आम्ही व्यस्त
मी आहे ब्राह्मण देशस्थ !!

ज्वारी झाली महाग तरी भाकरी चुकत नाही
वरणभातावर भागवण्याची आमची परंपरा नाही
चटण्या भाज्या असल्यावरच जेवण लागते मस्त
मी आहे ब्राह्मण देशस्थ !!

लग्न कार्य असतो आमचा महिनाभरचा खेळ
नसते कुठले बजेट ,ना हिशोब ना ताळमेळ
उसने देता घेता नसते काळजी किंवा खंत
मी आहे ब्राह्मण देशस्थ !!

गॅस जरी संपला तरी उपाशी रहात नाही
अडचणीला देशस्थाचाच शेजार धावून येई
वसुधैव कुटुंबावर असते नेहमीच भिस्त
मी आहे ब्राह्मण देशस्थ !!

"आला सण की घाल पुरण" अशी आमची रीत
पोळीवरती डावभर तूप .,,आम्ही नाही भीत!
हौसे पुढे कुठे असते महाग आणि स्वस्त?
मी आहे ब्राह्मण देशस्थ !!

सोने कसले घेता? जपतो सोन्यासारखे क्षण
पैसा प्रतिष्ठेहून मोलाचे समोरच्याचे मन
अंत्ययात्रेची गर्दी सांगे..आम्ही किती श्रीमंत!
मी आहे ब्राह्मण देशस्थ !!

गदिमांच्या शब्दांसाठी फडक्यांच्या चाली
चितळ्यांना मोठं करते देशस्थाचीच थाळी
आमची इन्फोसीस सांभाळते किती कोकणस्थ!
मी आहे ब्राह्मण देशस्थ !!

ऋषी मुनींची परंपरा रक्तामधे खेळते
आर्यधर्माचे बाळकडू गर्भामधेच मिळते
देशस्थातच जन्मा येती किती संतमहंत!
मी आहे ब्राह्मण देशस्थ

भाषा आमची माउलींची जणू इंद्रायणी
भक्ती प्याली नाथाघरच्या हौदामधले पाणी
ठामपणा शिकवत राही ..रामदासांचे ग्रंथ
मी आहे ब्राह्मण देशस्थ !!

क्रांतीकारक काय फक्त कोकणात जन्मा येतात?
फासावरले राजगुरू काय तुमचे काका लागतात?
नथुरामाचे रामायण ...काय सांगू जास्त?
मी आहे ब्राह्मण देशस्थ

कर्वे असतील मोठे, पण आमचे आमटेही महान!
माधुरीला झाकोळेल.. गंधर्वांची शान!
तरी देखील माजवत नाही कुठले आम्ही प्रस्थ
मी आहे ब्राह्मण देशस्थ !!

वसिष्ठांच्या छाटीला तर सूर्याइतकी दीप्ती
कमंडलूत समुद्र त्यांच्या , धरणी कुबडीवरती
सागराचे प्राशन करी आमच्यातला अगस्त्य 
मी आहे ब्राह्मण देशस्थ !! 

आमच्या देशस्थीची आगळीच आहे शान
कुठेही जा, देशस्थांनाच मिळतो अधिक मान
*"आमचे वागणे देशस्थीच" असे सांगतात कोकणस्थ*
मी आहे ब्राह्मण देशस्थ !! मी आहे ब्राह्मण देशस्थ !!

👆🏻👆🏻👆🏻
ह्याला माझ्या शाळेतील कऱ्हाडे मित्राच - अनिल खांडेकर - स्वरचित उत्तर 😀😀👇🏻👇🏻👇🏻

मी आहे ब्राह्मण कऱ्हाडे 
कोकणात, देशावर, सर्वदूर आमची बिऱ्हाडे  

अतिथी देवो भव: असा आमचा शिरस्ता

पोटातून हृदयाकडे जातो म्हणे प्रेमाचा रस्ता 

ओळखी इकडे तिकडे चोहीकडे 

मी आहे ब्राह्मण कऱ्हाडे!

भेटीगाठी ठरल्या की आधी भोजनाची चर्चा 

खमंग स्वादिष्ट जेवणात आमचा नंबर वरचा!

आमच्यात पुरुषही झकास रांधे-वाढे,

मी आहे ब्राह्मण कऱ्हाडे!

साधेपणा आणि नीटनेटकेपणा आमच्या अंगी 

उधळपट्टी कमी, तरी बेत सारे जंगी

कलागुणांची आवड आमच्याकडे 

मी आहे ब्राह्मण कऱ्हाडे!

फार ढिसाळ कारभार नाही, ना कडक शिस्त 

तरी चोख काम करण्यावार आमची भिस्त

ना अतिरेक काटकसरीचा, ना खर्चाचे राडे 

मी आहे ब्राह्मण कऱ्हाडे!

पक्वान्न नसली तरी चालतील, आमटी आमची जीव कि प्राण

शेजाऱ्यांशी चालू असते पदार्थांची देवाण घेवाण 

सगळं असलं तरी काहीतरी हवं डावीकडे,

मी आहे ब्राह्मण कऱ्हाडे! 

आलं गेलं सतत हवं तरच ते घर, असा आमचा नियम

आज हे येणारेत उद्या त्यांच्याकडे जायचंय चालू असतं कायम 

कुणाकडे गेल्यावर मदतीला सरसावतो पुढे 

मी आहे ब्राह्मण कऱ्हाडे!

मावस बहिणीचा मामेदीर तो चुलत भावाचा मावसभाऊ

नात्यांची कोडी घालत, सोडवत एकमेकांना धरून राहू

अर्धा वेळ गप्पा ह्याच, कधी गेलो कुणाकडे..

 मी आहे ब्राह्मण कऱ्हाडे!

खांडेकर, किर्लोस्कर, पराडकर, आणि सप्रे

महान व्यक्तींची यादी संपतच नाही बापरे!

पाध्ये, पंत, ठाकूरदेसाई आणि श्रीखंडे

मी आहे ब्राह्मण कऱ्हाडे! 

- अनिल खांडेकर
विलेपार्ले,
 Santosh Kulkarni: म्हणूनच म्हणतोय संगम होऊ देत तिघांचा
आपण सुखी समाज सुखी आणि देश सुखी
एक परिपूर्ण प्रेमाचा गोड संगम

रविवार, ५ सप्टेंबर, २०२१

rushi panchami ऋषी पंचमी

 ऋषी पंचमी, भाद्रपद शु. ५,

ऋषी नां नैवेद्य.
ऋषी- मुनी हे प्राचीन काळापासून चे थोर संशोधक.
अध्यात्म, विज्ञान, मानसशास्त्र, शेती, जीवशास्त्र, समाजशास्त्र अशा अनेक विषयावर त्यांनी मुलभूत संशोधन केले. मानवाला प्रगत बनवले. बहुतेक ऋषी विवाहित होते, पण अत्त्यंत साधे रहात.
परस बागेतील भाजी पाला व अन्न धान्यावर जगत. They had almost zero carbon footprint.
आज त्यांचे स्मरण करायचे व त्यांच्या सारखा साधा आहार घ्यायचा.
सर्वांनी हे व्रत प्रतिवर्ष अवश्य करावे!

मंगळवार, ३१ ऑगस्ट, २०२१

 History of Krishna Janmasthan (birthplace), Mathura

Temple dedicated to Krishna was built at the Krishna Janmasthan (birthplace), Mathura by his great grandson Vajranabh, thousands of years ago.

Mathura was a very pious and prosperous city, with hundreds of temples, which were centres of worship, education and social service.

Around 1017, Mahmud of Ghazni attacked and plundered Mathura. Ghazni's scribe, Al Utbi describes in his Tarikh-i-Yamini, wrote, "In the centre of the city there was a huge and magnificent temple, which the people believed wasn’t built by men but by the angels... Any description of the temple, either in words or in pictures, would fall short and fail to convey its beauty." Mahmud of Ghazni wrote, "if any one wished to construct a building equal to it, he would not be able to do so without spending a hundred million dinars, and the work would occupy two hundred years, even though the most able and experienced workmen were employed." He ordered to burn all the temples and demolish them. He plundered gold and silver idols and carried away a load of hundred camels. Local people faught a tough battle. Thousands of Hindus were killed and enslaved.

Abdullah, in the reign of Mughal emperor Jehangir, mentions in Tarikh-i-Daudi the destruction of Mathura and its temples by Delhi Sultan Sikandar Lodi in 16th century. Lodhi again killed and enslaved many Hindus. Lodi had prohibited Hindus from bathing in the river and shaving of heads on the banks as well. In the reign of Jehangir, in 1618, Raja Veer Singh Deva Bundela of Orchha had built a temple at the cost of thirty-three lakhs. A French traveller Tavernier visited Mathura in 1650 and had described the octagonal temple built in red sand stone. Italian traveller Niccolao Manucci who worked in Mughal court has also described the temple.

Mathura governor Abdun Nabi Khan on the order of Mughal emperor Aurangzeb, killed large number of innocent Hindus and destroyed several temples and he built the Jama mosque on the ruins of the Hindu temples. Abdul Nabi Khan was killed by people in 1669. Aurangzeb attacked Mathura and destroyed that Keshavdeva temple in 1670 and built the Shahi Eidgah in its place.

The major purpose of repeated destruction of our temples was to create fear and enslave Indians. But Hindus never gave up and kept on reclaiming.

India got freedom in 1947, but these encroachments continue even today. If we wish to regain self-confidence, all these signs of victory of foreign rulers need to be removed. Temples should be restored as places of worship, learning and social service.

Let’s raise for this national cause.

 



शुक्रवार, २५ जून, २०२१

Vat Pournima Marathi

 सत्यवानाची सावित्री होऊ नको - फुल्यांची सावित्री हो


असा 'उपदेश' काही अति शहाण्यांनी केला.


हे योग्य नाही.


सत्यवानाची सावित्री ही एक महान स्त्री होती. तिने मरू घातलेल्या नवऱ्याला मरू दिले नाही.

संकट काळात सुद्धा तिने धीर सोडला नाही.


तिचा यमाशी संवाद उच्च अध्यात्मिक पातळी दाखवतो. तिचा आरोग्याचा असामान्य अभ्यास पाहून तिचा गौरव केलेला आहे.


ती वैद्यक शास्त्रात अतिशय निपुण असली पाहिजे. सत्यवानही तिच्याकडे आधी रूग्ण म्हणून आला मग ही त्याच्या प्रेमात पडली असे घडले असा तर्क करता येतो.


तिने धैर्याने त्याच्याशी लग्न केले, सासुसासऱ्यांचे अंधत्व दूर केले आणि त्याचाही विकोपाला गेलेला आजार बरा केला. वास्तविक लोक सूत धरून बसलेले पण हिचे धैर्य आणि आपल्या ज्ञानातून आलेला आत्मविश्वास अपूर्व होता. सत्यवान मेला नाही, उठून बसला.


हा एक विषय. दुसरे. तिने जबरदस्त डावपेच लढवले आणि ह्या तिघांच्या आजारपणात गेलेले राज्य तिने परत मिळवले.


भावना, बुद्धी, धैर्य आणि विज्ञान तिच्या अंकित होते.


ज्यांना म. फुल्यांसारखा नवरा मिळेल त्या मुलींना सावित्रीबाई फुले व्हायची संधी असेल. ती संधी जिला मिळेल तिने अवश्य तसे व्हावे.


पण आपल्या अविवाहित लहान मुलींसमोर आदर्श उभा करायचा असेल तर तो सत्यवानाच्या सावित्रीचाच केला पाहिजे.


अंधश्रद्ध होऊ नका,


अश्रद्ध होऊ नका.


स्वतःला बुद्धिवादी म्हणणारे त्यांची बुद्धी लोकांवर लादत असतात


त्यांना बळी पडून आपल्या अपत्यांचा बुद्धिभेद करू नका.


आणि स्वतःलाही अशांपासून सांभाळा.

गुरुवार, २४ जून, २०२१

वटपौर्णिमा !

 #वटपोर्णिमा


#Celebrate_marriage


#Be_Dharmic_Be_Satvik


#भारतातले_वृक्ष


उद्या वटपौर्णिमा म्हणजे जेष्ठ पक्षातील पौर्णिमा, जेष्ठ पौर्णिमा!


नवरा आणि बायको, पती आणि पत्नी ह्यांच्या नात्याचा गोडवा, पवित्रता जपणारा असा हा सण! 

धार्मिक उत्सव सुरू झाल्याची चाहूल देणारा पहिला सण... 


कोविद चे सावट आहेच, पण "वर्क फ्रॉम होम" असल्याने आपण अगदी अर्धा तास काढून हे व्रत छान पद्धतीने करू शकतो. ऑफिस मधून यायला उशीर झाला हे कारण देता येणार नाही 😊


आपले कुठलेच सण "यूँही" नसतात! कोणतातरी पराक्रम, कोणतीतरी महत्त्वाची घटना वर्षानुवर्षे लक्षात रहावी आणि समाजाची वीण घट्ट व्हावी म्हणून आपण सण साजरे करतो. ह्याला अर्थातच शास्त्रीय कारणे, सामाजिक कारणे व निसर्ग ह्याची जोड दिलेलीच असते.


काय आहे हे "वटसावित्री" हे व्रत? पट्कन पाहूया...


अश्वपती नावाच्या राजाने, संतानप्राप्तीसाठी देवी सावित्रीला प्रसन्न करून घेतले आणि देवीच्या कृपेने त्याला कन्यारत्न झाले. त्या कन्येचे नाव राजाने ठेवले सावित्री! 

अतिशय तेजस्वी असलेल्या सावित्रीने सत्यवान नावाच्या अतिशय पराक्रमी, सज्जन, तपस्वी राजपुत्राला वर म्हणून निवडले... नारदमुनीनी जेव्हा सावित्री ला सांगितले की सत्यवान अल्पायुषी आहे व लग्नाच्या वर्षभरातच मरणार तेव्हा आपला निर्णय न बदलता ह्या तेजस्वी स्त्रीने वर्षाअखेर 3 रात्र "वटसावित्री" हे व्रत केले. आणि साक्षात यमदेवाकडून सत्यवानाचे प्राण परत आणले.

असे देवी सावित्रीचे सावित्रीने केलेले व्रत म्हणजे वटपौर्णिमा व्रत!


सावित्री जशी यमाकडून पतीचे प्राण पुन्हा खेचून आणते, ती क्षमता, ती capability प्रत्त्येक स्त्री मध्ये आहे ह्याची आठवण करून देणारा हा सण!


#भक्कम_कुटुंब_व्यवस्था


नवीन लग्न झालेले जोडपे असो किंवा नातं पूर्ण मुरलेले, आपली पत्नी आपल्यासाठी छान नटली आहे, सुंदर दिसते आहे, पूजा करून आली आहे आणि आपल्या उत्तम आयुष्यासाठी प्रार्थना करून आली आहे हे कुठल्या बरे नवऱ्याला आवडणार नाही... प्रेम वृद्धींगत करणारा असा हा सण! 😊😊


महामार्गावर दोरा गुंडाळलेला वड दिसला की एकदातरी, स्वतः केलेली पूजा, नवऱ्याने नजरेनेच "सुंदर दिसतेयस" सांगितलेला क्षण, आठवेल की नाही? म्हणून साजरा करायचा हा सण! 😊😊


पती-पत्नी एकमेकांबरोबर पूर्ण आयुष्य राहतात (राहू शकतात) आणि आपले घरकुल, आपले कुटुंब जोपासतात (अनेक त्याग करून) ही संपूर्ण जगाला भारताने दिलेली शिकवण आहे. हे कमावण्यासाठी उचललेले छोटेसे पाऊल, म्हणून साजरा करायचा हा सण! 😊😊


#पर्यावरण_पूरक


आपण ज्याची पूजा करतो ना, त्यावर कुऱ्हाड चालवताना क्षणभर तरी थांबतो, एखाद्याला विचारतो, का रे बाबा झाड तोडतो आहेस? This is human tendency, human mind. 

एक वडाचे झाड शंभर व्यक्तीना शंभर वर्षे पुरेल एवढा प्राणवायु देते असे म्हणतात. प्राणवायूची कमतरता झाली तर काय काय होऊ शकते हे आपण काही महिन्यांपूर्वीच पाहिलेले आहे.

पर्यावरण रक्षणासाठी उचललेले छोटेसे पाऊल! 


#धार्मिक_शास्त्रीय


आणखी एक महत्त्वाचे - वड - हा यज्ञीय वृक्ष आहे. म्हणजे आपण जेव्हा देवतांची पूजा करताना होम, हवन करतो तेव्हा ह्या वृक्षाच्या समिधा यज्ञात वापरल्या जातात. ह्या वृक्षामध्ये साक्षात भगवंताचा वास असतो. वटवृक्षाची पूजा केल्याने आपले पितृ संतुष्ट होतात आणि पती-पत्नींमधील नाते घट्ट होऊन, वंश संरक्षण होते. 


#औषधी


औषधी गुणधर्मामुळे वडाच्या झाडाच्या आसपासची हवा अत्यंत शुद्ध असते. आसपास भरपूर प्राणवायू असतो. त्याचा आपल्या आरोग्यावर अतिशय सुंदर परिणाम होतो.


गर्भाच्या संरक्षणासाठी वटांकुर रस गर्भवतीच्या नाकात घातला जातो. 


#वडाची_पूजा


कसे आहे ना, वटसावित्री व्रत असे म्हणले की काहीतरी खूप अवघड वाटते, वडाची पूजा म्हणले ना की सोप्पे वाटते 😊😊


मग कशी करूया वडाची पूजा?


आता आपण 3 दिवसांचे व्रत कोणीच करत नाही. पण कमीतकमी उद्या पूजा होईपर्यंत उपवास करून, आपल्या अंगणात, आवारात, जवळपास वडाचे झाड असेल तर तिथे जाऊन, गणपती, विष्णु, शंकर, सूर्य व सावित्री देवी ह्यांची मनोभावे प्रार्थना करायची. 


हळद, कुंकू व इतर उपचार द्रव्य ह्यांनी झाडाची, देवी सावित्री ची पूजा करून वडाच्या झाडाच्या सानिध्यात, त्याचे औषधी गुणधर्म, भरपूर ऑक्सिजन आपल्याला मिळावा म्हणून 7 प्रदक्षिणा वडाला घालायच्या, किंवा काही काळ तरी बसायचे. 


खालील मन्त्र म्हणून वडास नमस्कार करावा.


"सावित्री ब्रम्हा वादिनी सर्वदा प्रिय भाषिणी।

तेन सत्येनमां पाहि दुःखसंसार सागरात।।

अवियोगि यथा देव सवित्र्या सहीतस्य ते।

अवियोग तथास्माकं भूयात् जन्म जन्मनि।।"


ब्राह्मण दानाला ह्या व्रतामध्ये विशेष महत्त्व आहे. न विसरता गुरुजींची दक्षिणा बाजूला काढून नंतर गुरुजींची भेट झाल्यावर द्यायची किंवा google pay झिंदाबाद! तिथे बसून गुरुजींना ट्रान्सफर केलेत तरी चालेल :) :) 


Celebrate, enjoy... रडक्या लोकांकडे दुर्लक्ष करा. 


आपल्या सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. सत्यवान व सावित्री प्रमाणेच, सावित्री देवी आपल्या सर्वांना ऐश्वर्य, आरोग्य, पुत्र-पुत्री, यश व कीर्ती भरभरून देवो हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना...


शुभं भवतु | 


--- मृदुला बर्वे, oPandit

Vat Pournima

 #विवाहविचार लेखक सुजीत भोगले


सावित्री कोण होती ?? 


वटसावित्री अर्थात वटपौर्णिमेचा सण आला की हिंदू पुरुष थट्टा करण्याच्या मूड मध्ये येतात. सात जन्म याच बायकोला कसे झेलणार आहोत वगेरे. हिंदू लोक सुद्धा स्वतःच्या कळत नकळत या दिवसाची थट्टा करायला लागतात. फुरोगामी आणि हिंदू द्वेषी मंडळीना तर हिस्टेरिया होतो. 


परंतु विवाहविचार या संकल्पनेतील सर्वाधिक सुंदर कथा सावित्रीची आहे. पाश्चात्य देशातील मंडळी ‘woman of substance” या संकल्पनेचा उल्लेख वारंवार करत असतात. सावित्री ही त्या संकल्पनेचे मूर्त रूप आहे. 


महाभारतात एकदा युधिष्ठीर मार्कंडेय ऋषींना म्हणाला की या विश्वात द्रौपदी समान समर्पित आणि त्यागमयी स्त्री अन्य कोणीही नाही. द्रौपदीचा उल्लेख पंचकन्यांच्या मध्ये केला जातो ज्या प्रातःस्मरणीय आहेत. परंतु मार्कंडेय ऋषी युधिष्ठिराचे मत खोडून काढतात आणि त्याला सावित्रीची कथा सांगतात. 


सावित्री ही अश्वपती राजाचे एकमेव अपत्य असते. सावित्री ही अत्यंत रूपवान, गुणवान आणि बुद्धिमंत असते. तिच्या या रूप गुण आणि विद्वत्तेची चर्चा स्वर्ग लोकात सुद्धा होत असते. अश्वपती राजाला आपल्या कन्येचा विवाह विष्णूशी व्हावा असे वाटते. तो नारदाच्या मार्फत तसा संदेश विष्णूकडे पाठवतो. परंतु तिच्या रूप, गुण आणि बुद्धिमत्तेच्या पासंगाला आपण पुरणार नाही हे जाणून विष्णू त्या विवाहाला नकार देतो.(इथे विष्णू हे पद म्हणून समजून घ्या. देव म्हणून नाही ) 


सावित्री द्युमत्सेन राजाच्या सत्यवान नावाच्या पुत्रावर अनुरक्त असते. सत्यवान हा अत्यंत गुणवान असतो परंतु त्याच्या वडिलांचे राज्य हरण झालेले असते. तो आपल्या अंध आणि वृद्ध आई वडिलांच्या सह एका जंगलाच्या जवळ निवास करत असतो. जंगलातील लाकडे तोडून तो उदरनिर्वाह करत असतो. अश्या परिस्थितीने गांजलेल्या परंतु अत्यंत गुणवान अश्या सत्यवानावर सावित्री प्रेम करत असते आणि त्याच्याशी विवाह करण्याची तिची इच्छा असते. नारदमुनी सावित्रीची भेट घेऊन तिला कल्पना देतात की ज्याच्याशी तू लग्न करण्याचे स्वप्न पहात आहेस त्याच्या नशिबात विवाहाच्या नंतर एका वर्षात मृत्यूयोग आहे. हे सत्य अवगत झाल्यावर सुद्धा सावित्री सत्यवानाशी विवाह करण्यावर ठाम रहाते.


विवाहाच्या नंतर सावित्री आपल्या अंध आणि वृद्ध सासू सासर्यांची सेवा करत पतीसह छोट्याश्या झोपडीत आनंदाने राहू लागते. ज्या दिवशी सत्यवानाचा मृत्यू होईल असे नारदाने सांगितलेले असते त्या दिवशी ती स्वतः सत्यवानाच्या बरोबर जंगलात जाते. सत्यवान मूर्च्छित होतो आणि सावित्री वडाच्या झाडाखाली त्याचे मस्तक आपल्या मांडीवर घेऊन बसते त्यावेळी तिथे यम येतो आणि सत्यवानाचे प्राण हरण करून घेऊन जाऊ लागतो. त्यावेळी सावित्री यमाच्या मागोमाग कारण देह धारण करून जाऊ लागते. 


यम तिला थांबवतो आणि तू प्रकृतीच्या नियमात फेरफार करू शकत नाहीस हे बजावतो. त्यानंतर सावित्री आणि यमाचा शास्त्रार्थ होतो. या शास्त्रार्थात ती यमाला पराभूत करते आणि त्याबद्दल यम तिला तीन वरदान प्रदान करतो पण सत्यवानाचे प्राण मागणार नाहीस हे वचन घेतो. पहिल्या वरदानात सावित्री यमाकडे आपल्या अंध सासू सासर्यांच्या साठी नेत्र मागते. दुसऱ्या वरदानात ती यमाकडे आपल्या सासर्यांना त्यांचे गेलेले राज्य परत मिळावे म्हणून वरदान मागते आणि तिसऱ्या वरदानात ती यमाकडे १०० पुत्रांचे वरदान मागते. अर्थात शंभर पुत्रप्राप्तीसाठी सत्यवानाचे प्राण परत करणे यमाला भाग पडणार असते.


अश्या रीतीने सावित्री यमाच्या तावडीतून आपल्या पतीचा जीव वाचवते आणि त्याला दीर्घायुष्य मिळून देते. या घटनेत सावित्री वडाच्या झाडाखाली बसली होती म्हणून वडाच्या झाडाला फेऱ्या मारण्याची दीर्घायुष्याचे प्रतिक म्हणून तातू गुंडाळण्याची प्रथा आहे. या दिवसाच्या बद्दल सावित्रीला पूर्व कल्पना असल्याने ती त्या दिवसाच्या पूर्वी तीन दिवस पूर्ण कठोर उपवास करते. त्या मुळे आज स्त्रिया या दिवशी उपवास करतात.    


या कथेतून आपण काय बोध घेऊ शकतो ते सांगतो. 


१) पराकोटीची गुणवान, बुद्धिमंत आणि सुंदर असणारी सावित्री मनोवांच्छित वर हा त्याच्या गुणांवर निवडते. आर्थिक दृष्ट्या तो विपन्न अवस्थेत आहे. परंतु ती त्याचे गुण पाहून त्याला स्वीकारते. अर्थात गुणग्राहकता. केवळ पैसा आणि लग्नाच्या नंतर राहण्याचे ठिकाण या गोष्टीला प्रमाण मानून लग्न ठरवण्याचा विचार करणाऱ्या मुलींनी हा मुद्दा निश्चित विचारात घेतला पाहिजे. 


२) त्याच्या अपमृत्यूच्या बद्दल तिला पूर्वकल्पना नारदमुनी देतात तरीही तिचा निश्चय अढळ रहातो. आपल्याकडे एक प्राचीन नियम असे. कोणीही तपस्या करून ईश्वरी शक्तीला वरदान मागताना गुणवंत पुत्र किंवा कन्या मागितली तर त्याला गुणवान अपत्य अल्पायु असेल आणि निर्बुद्ध अपत्य दीर्घायू असेल असाच ऑप्शन दिला जाई आणि दरवेळी प्रत्येकाने अल्पायु परंतु गुणवान अपत्याचीच मागणी केली आहे.. याला गुणवत्तेला महत्व देणे. किंवा quality is more important than quantity हे दिसून येते. गुणहीन व्यक्तीसह आयुष्य व्यतीत करणे आणि गुणवान व मनोवांच्छित व्यक्तीसह एकच वर्षाचे वैवाहिक सुख प्राप्त करणे यातील दुसरा पर्याय सावित्री निवडते ही गोष्ट एक व्यक्ती म्हणून तिचा दर्जा दर्शवते.   


आता हेच धाडस हीच मानसिकता आपल्या कडे पोलीस खात्यात, सैन्यदलात काम करणाऱ्या पुरुषांना आपला पती म्हणून निवडणाऱ्या मुलींची असते. त्या दृष्टीने त्या सुद्धा सावित्रीच्या इतक्याच आदरणीय आहेत. म्हणूनच श्री मुकाम्बिका वरदिव्यसहस्त्रनामात वीरपत्नी आणि वीरमाता या दोघीही जणी मृत्योपरांत वीरलोकात निवास करण्याच्या अधिकारी आहेत आणि त्यांचा त्याग सुद्धा वीराच्या इतकाच श्रेष्ठ आणि थोर आहे असा उल्लेख केला आहे. 


३) अश्वपती राजाचा उल्लेख राजर्षी असा केला आहे. अर्थात तो एक श्रेष्ठ राजा होता. त्याची कन्या अश्या प्रकारे राजकुलातील परंतु कफल्लक असलेल्या सत्यवानाला पती म्हणून स्वीकारते तरीही तिचे आई वडील तिला विरोध करत नाहीत. ना गरीब सत्यवानाच्या घरात आपली मुलगी कशी राहील हा विचार करून तिला आर्थिक बळ प्रदान करण्याचा प्रयास करतात. आपल्या मुलीच्या जीवनात आणि प्रपंचात ढवळाढवळ न करण्याची जी परिपक्वता सावित्रीचे आईवडील दाखवतात ती आजच्या मुलामुलींच्या पालकांनी सुद्धा दाखवणे अत्यंत आवश्यक आहे. 


४)  सावित्री यमाशी शास्त्रार्थ करते, त्याला निरुत्तर करते आणि त्याच्याकडून आपल्या पतीचे प्राण पुनश्च प्राप्त करते यात ती सुशिक्षित, ज्ञानी आणि बुद्धिमान होती हे सिद्ध होतेच. त्यामुळे स्त्री गौण आहे, तिला शिक्षण दिले जात नसे छाप विषारी प्रचार किती पूर्वग्रहदुषित आहे हे यातून सिद्ध होते. सावित्रीच्या बुद्धिमत्तेला जाणून घेणे खूप आवश्यक आहे.ती यमाला प्रथम आपल्या अंध आणि वृद्ध सासू सासऱ्यांच्या साठी नेत्र मागते. अर्थात जर तिला सत्यवानाबरोबर सहगमन करायची वेळ आली तरी आपल्या सासू सासऱ्यांना नेत्र असणे अत्यंत आवश्यक होते. दुसऱ्या वरदानात ती त्यांचे राज्य मागते अर्थात यावेळी सुद्धा विचार तोच आहे की आपण जर पतीचे प्राण वाचवण्यात अपयशी झालो तर तरीही आपल्या सासू सासऱ्यांना उर्वरित आयुष्य सुखात व्यतीत करता येईल. तिसर्या वरदानात ती अप्रत्यक्ष रित्या यमाला शब्दात अडकवून त्याच्याकडून पतीचे प्राण पुनश्च परत मिळवते. सर्वप्रथम संपूर्ण कुटुंबाचा विचार ही आपली प्राचीन परंपरा सावित्री निर्वहन करताना दिसते. न्यूक्लीयर family या नावाखाली आपण आपली कुटुंबव्यवस्था उध्वस्त करून टाकतो आहोत याची आपल्या कुणालाच खंत वाटत नाही हा सुद्धा एक लज्जास्पद भाग आहे. 


५) आपले सणवार व्रतवैकल्ये केवळ आपल्याला अन्नातील बदल किंवा एक दिवस लंघन करण्याच्या साठी सांगितलेली कथा नाही. त्यामागे आपल्याला प्रेरणा देऊ शकेल आपल्या संस्कृतीमधील सकारात्मकता समजेल इतकेच नाही तर आपल्याला नैतिकतेचे आणि मानवतेचे उत्कृष्ट जीवनमूल्ये सांगू शकेल असे तत्वज्ञान असते. ते तत्वज्ञान आपण आत्मसात करणे अभिप्रेत आहे. त्याची सवंग टिंगल उडवणे हे छपरीपणाचे लक्षण आहे. याचा प्रत्येक हिंदूने गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.  


६) आज जन्मोजन्मी हाच पती ही जी संकल्पना मांडली जाते आहे, किंवा सप्तजन्मी हाच पती ही जी संकल्पना मांडली जाते आहे तिच्या मागील विचार सांगतो. प्राचीन काळात शतायुषी होणे हे ध्येय मानले जाई. विवाह तारुण्यात होतो, मग पतीपत्नी म्हणून आमचे सहजीवन कमीतकमी ऐंशी ते शंभर वर्ष असावे ही कामना त्यामागे होती. याचे कारण असे की मानवी देह पूर्णांशाने बारा वर्षात पुनरुज्जीवित होतो, म्हणून १२ X ७ =८४ अर्थात अश्या सप्त जन्म मला या पतीचा सहवास लाभावा हा भाव होता. अर्थात मला स्वतःला आणि माझ्या पतीला निरोगी राहून शतायुषी होता यावे आणि त्या संपूर्ण कालखंडात मला त्याचा भरभरून सहवास लाभावा ही कामना होती. 


७) साक्षात यमधर्माशी शास्त्रार्थ करून आपल्या पतीचे प्राण वाचवणारी सावित्री ही त्या दृष्टीने बेंचमार्क. त्या घटनेचे प्रतिक म्हणजे वटवृक्ष तो सुद्धा अत्यंत दीर्घायू म्हणून प्रसिद्ध आहे. मग त्याला तातू गुंडाळणे हे त्या भावनेचे प्रकटीकरण होते.     


या उदात्त विचाराची थट्टा उडवणारा पुरुष अथवा स्त्री यांना पतीपत्नी या नात्याचे परस्परपुरकत्वच समजले नाही असे मला अत्यंत खेदाने नमूद करावे लागते आहे. 


माझे विचार पटले असतील तर हा लेख अवश्य प्रसारित करा. 


© सुजीत भोगले

मंगळवार, ८ जून, २०२१

 

Birsa Munda (1875–1900) was a Hindu leader and a folk hero, belonging to the Munda tribe who was behind the independence movement that rose in the tribal belt of modern day Bihar, and Jharkhand during the British Raj, in the late 19th century making him an important figure in the history of the Indian independence movement.
Even though he lived for just 25-years, Birsa Munda is one legend who has made a long-standing impact on India’s fight against the British. A young freedom fighter and a tribal leader, whose spirit of activism in the late nineteenth century, is remembered to be a strong mark of protest against British rule in India.
Munda spent his childhood amidst poverty in a typical tribal setup, where he was forcefully converted to Christianity and was named Birsa David. he got education from a missionary school.
During the late 1880s, Munda began to understand the nature of exploitation meted out by the British against the native tribals. The huge disruption caused by British agrarian policies made an impact on the livelihood of these tribal people, disrupting their usual way of life which was hitherto peaceful and in tune with nature. Not only British economic and political policies but also aggressive religious and cultural policies of the Christian missionaries which belittled the tribal people and their culture acted as fuel for their fight against the British.
In 1894, Birsa Munda began to awake masses and also arose them against the British atrocities. Not only the tribals but also many other people also flocked to see the new leader of the masses. he was worshipped and became popular as Bhagwan Birsa Munda.
The Christian missionaries were unnerved as Birsa was becoming the stumbling block in the path of conversion. Many within Christianity also began to join Mundas .
In 1895, Birsa asked his fellow tribesman to renounce Christianity and guided them to worship one Bhagwan and showed them the path of purity, austerity and prohibited cow- slaughters. His simple system of offering was directed against the church which levied a tax. He stated that the reign of Queen Victoria was over and the Munda Raj has begun.
On February 3, 1900, Birsa Munda was caught by the British from Jamkopai forest, Chakradharpur. On June 9, 1900, Birsa Munda was brutally killed by the British while lodged at the Ranchi jail aged just 25.